समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – सरसेनापती हंबीरराव मोहिते राष्ट्रीय प्रतिष्ठान, पुणे आणि रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रामलिंग, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे पराक्रमी सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच स्वराज सौदामिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त ऐतिहासिक राष्ट्रगौरव शौर्य पुरस्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
हा भव्य सोहळा शिरूर शहरातील बाबुरावनगर परिसरात असलेल्या ज्ञानगंगा विश्व विद्यालयात उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चना भोर यांनी “हंबीरराव मोहिते यांची कन्या मी ताराराणी बोलते” या विषयावर प्रभावी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान सादर केले. त्यांच्या व्याख्यानातून छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या शौर्य, नेतृत्वगुण, राजकीय दूरदृष्टी आणि स्वराज्य रक्षणातील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. उपस्थित श्रोते या व्याख्यानाने मंत्रमुग्ध झालेले पहावयास मिळाले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, इतिहासप्रेमी नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सोहळ्याच्या माध्यमातून स्वराज्याच्या इतिहासातील शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करण्यात आले. या वेळी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मान्यवरांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे – प्रा .डॉ.राजेराम प्रभू घावटे – राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार,अर्चना भोर – आदर्श महिला व्याख्यात्या पुरस्कार,निलेश काळे-राष्ट्रीय सोशल मीडिया इन्फ्लूएंसर पुरस्कार,डॉ.सुनीता पोटे- राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार,संजयराव शितोळे -शिक्षण महर्षी राष्ट्रगौरव पुरस्कार,तृप्ती सरोदे-आदर्श समाजसेविका पुरस्कार,भाऊसाहेब दहिफळे- तालुकास्तरिय प्रेरणा पुरस्कार देण्यात आले.
हा भव्य सोहळा शिरूर शहरातील बाबुरावनगर परिसरात असलेल्या ज्ञानगंगा विश्व विद्यालयात उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चना भोर यांनी “हंबीरराव मोहिते यांची कन्या मी ताराराणी बोलते” या विषयावर प्रभावी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान सादर केले. त्यांच्या व्याख्यानातून छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या शौर्य, नेतृत्वगुण, राजकीय दूरदृष्टी आणि स्वराज्य रक्षणातील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. उपस्थित श्रोते या व्याख्यानाने मंत्रमुग्ध झालेले पहावयास मिळाले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, इतिहासप्रेमी नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सोहळ्याच्या माध्यमातून स्वराज्याच्या इतिहासातील शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करण्यात आले. या वेळी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मान्यवरांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे – प्रा .डॉ.राजेराम प्रभू घावटे – राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार,अर्चना भोर – आदर्श महिला व्याख्यात्या पुरस्कार,निलेश काळे-राष्ट्रीय सोशल मीडिया इन्फ्लूएंसर पुरस्कार,डॉ.सुनीता पोटे- राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार,संजयराव शितोळे -शिक्षण महर्षी राष्ट्रगौरव पुरस्कार,तृप्ती सरोदे-आदर्श समाजसेविका पुरस्कार,भाऊसाहेब दहिफळे- तालुकास्तरिय प्रेरणा पुरस्कार देण्यात आले.

या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र ऊर्फ संग्रामसिंह मोहिते पाटिल (अध्यक्ष सरसेनापती हंबीरराव मोहिते राष्ट्रीय प्रतिष्ठान पुणे), कुणालदादा मालुसरे (वंशज सुभेदार तानाजी मालुसरे),दि पकराजे शिर्के (वंशज महाराणी येसूबाई),अमितदादा गाडे (दूधमाता धाराऊ चे वंशज) , सचिन दादा भोसले पाटिल नागपूरकर , महेंद्रजी नवले (गावगाडा इतिहास अभ्यासक), शुभम मोहिते (वंशज सरसेनापती हंबीरराव),आदित्य मोहिते (वंशज सरसेनापती हंबीरराव),सचिन मोहिते (वंशज सरसेनापती हंबीरराव),खलील भाई शेख (सुप्रसिद्ध शिवव्याख्याते) आणि आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या अश्विनी उर्फ राणीताई कर्डीले यांनी यावेळी प्रास्ताविक सादर केले. तर कार्यक्रमात महत्वपूर्ण उपस्थिती म्हणजे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप केंजळे,पत्रकार तेजस फडके ( दैनिक प्रभात), ऍड.बाबुशेठ मोरे (सोनाई मार्केट),अजय गायकवाड, बच्चूभाऊ गव्हाणे (राष्ट्रवादी शरद पवार गट – शिरूर तालुका युवा अध्यक्ष) आणि इतर मान्यवरउपस्थित होते. कार्यकामाचे सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी शामकांत वर्पे यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये इतिहासाबद्दल जागृती निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.
“सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची पुण्यतिथी आणि महाराणी ताराराणी यांची पुण्यतिथी यांच्या निमित्त ठेवण्यात आलेले पुरस्कार हे पुरस्कार चार भिंतीत हॉलमध्ये न घेता 4 ते 5 हजार संख्या असलेल्या कॉलेज मध्ये घेण्याचे उद्दिष्ट एवढेच आहे की सरसेनापती हंबीरराव आणि महाराणी ताराराणी हे सर्वसामान्य
विद्यार्थ्यांना संस्काररूपी खोल रुजवले जावेत म्हणजे हे पुरस्कार दिल्याचे सार्थक लाभेल.
-राजेंद्र ऊर्फ संग्रामसिंह मोहिते पाटिल (अध्यक्ष सरसेनापती हंबीरराव मोहिते राष्ट्रीय प्रतिष्ठान,पुणे)



