समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूरच्या बेट भागातून जाणाऱ्या मीना शाखा कालव्या अंतर्गत येणाऱ्या पाणी वापर संस्थांनी २०२४–२०२५ या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत शिरूर तालुक्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. तीनही शाखांमधील संस्थांनी मार्च अखेर पाटबंधारे विभागाकडे मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी कर जमा केला आहे.
शाखानिहाय वसुलीचा आढावा घेतला असता, टाकळी हाजी शाखेतील आठ पाणी वापर संस्थांकडून ३ लाख ६३ हजार २७५ रुपयांची वसुली करण्यात आली. जांबुत शाखेतील नऊ संस्थांनी ८ लाख १८ हजार रुपये जमा केले, तर शिरोली तर्फे आळे शाखेतील सहा संस्थांनी ७ लाख ६४ हजार रुपयांची पाणीपट्टी भरली.
यामध्ये टाकळी हाजी शाखेतील गुरुनाथ पाणी वापर संस्था क्र.३७, को.पो.बंधारे वडनेर यांनी ३ लाख ५४ हजार रुपये, तसेच जांबुत शाखेतील संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्था क्र.३१, को.पो.बंधारे शरदवाडी/जांबुत यांनी ३ लाख ७० हजार रुपये एकरकमी भरून विशेष उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या पुढाकारामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक भागांत पाणीपट्टी भरण्याबाबत उदासीनता दिसून येत असताना वडनेर व शरदवाडी (जांबुत) येथील ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ही माहिती मीना शाखा कालवा अध्यक्ष व घोड/कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे यांनी दिली. पाणीपट्टी थकल्यास ऐनवेळी पाणी सोडताना तांत्रिक अडचणी निर्माण होतात व त्याचा थेट परिणाम पिकांवर होतो, ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम श्रीकृष्ण पाणी वापर संस्थेचे चेअरमन सुभाष झिंजाड सातत्याने करत आहेत.
दरम्यान, माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे, पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे आणि सरपंच दामू घोडे यांनीही वेळोवेळी शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले होते.या उपक्रमाची दखल घेत कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, उपअभियंता कुकडी पाटबंधारे उपविभाग क्र.२ नारायणगाव येथील सचिन शिंदे, टाकळी हाजी शाखा अधिकारी व्ही. पी. पाटील तसेच जांबुत/शिरोली शाखा अधिकारी ए. एल. कुमावत यांनी पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.एकूणच, शिस्तबद्ध वसुली, ग्रामस्थांची एकजूट आणि जनजागृतीच्या प्रयत्नांमुळे मीना शाखा कालवा परिसरात पाणी व्यवस्थापनाचे आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.
शाखानिहाय वसुलीचा आढावा घेतला असता, टाकळी हाजी शाखेतील आठ पाणी वापर संस्थांकडून ३ लाख ६३ हजार २७५ रुपयांची वसुली करण्यात आली. जांबुत शाखेतील नऊ संस्थांनी ८ लाख १८ हजार रुपये जमा केले, तर शिरोली तर्फे आळे शाखेतील सहा संस्थांनी ७ लाख ६४ हजार रुपयांची पाणीपट्टी भरली.
यामध्ये टाकळी हाजी शाखेतील गुरुनाथ पाणी वापर संस्था क्र.३७, को.पो.बंधारे वडनेर यांनी ३ लाख ५४ हजार रुपये, तसेच जांबुत शाखेतील संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्था क्र.३१, को.पो.बंधारे शरदवाडी/जांबुत यांनी ३ लाख ७० हजार रुपये एकरकमी भरून विशेष उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या पुढाकारामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक भागांत पाणीपट्टी भरण्याबाबत उदासीनता दिसून येत असताना वडनेर व शरदवाडी (जांबुत) येथील ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ही माहिती मीना शाखा कालवा अध्यक्ष व घोड/कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे यांनी दिली. पाणीपट्टी थकल्यास ऐनवेळी पाणी सोडताना तांत्रिक अडचणी निर्माण होतात व त्याचा थेट परिणाम पिकांवर होतो, ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम श्रीकृष्ण पाणी वापर संस्थेचे चेअरमन सुभाष झिंजाड सातत्याने करत आहेत.
दरम्यान, माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे, पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे आणि सरपंच दामू घोडे यांनीही वेळोवेळी शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले होते.या उपक्रमाची दखल घेत कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, उपअभियंता कुकडी पाटबंधारे उपविभाग क्र.२ नारायणगाव येथील सचिन शिंदे, टाकळी हाजी शाखा अधिकारी व्ही. पी. पाटील तसेच जांबुत/शिरोली शाखा अधिकारी ए. एल. कुमावत यांनी पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.एकूणच, शिस्तबद्ध वसुली, ग्रामस्थांची एकजूट आणि जनजागृतीच्या प्रयत्नांमुळे मीना शाखा कालवा परिसरात पाणी व्यवस्थापनाचे आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.

