मुरबाड,ठाणे : मुंबई पासुन 90 किमी अंतरावर असणाऱ्या मुरबाड रेल्वेसाठी आजुनही प्रतिक्षा असुन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण मेट्रोचे भुमिपुजन करण्यात आले. व याचे बँनर मुरबाड मध्ये हि झळकले. या बँनर बाजी नंतर मुरबाड मध्ये व कल्याण मुरबाड महामार्गा वर चार वर्षा पुर्वी टिटवाळा -मुरबाड रेल्वे प्रकल्पाच्या सर्वेचे बँनर झळकले मात्र आज पर्यत हा प्रस्थावित मार्ग प्रतिक्षेतच आहे.
नुकताच खासदार कपिल पाटील यानी मुरबाड मधिल एका कार्यक्रमात रेल्वे चा सर्वेक्षण रिपोर्ट फिजीबल असल्याची माहीती दिली व येत्या मिनी अर्थिक बजेट मध्ये यासाठी अर्थिक तरतुद होईल असे आश्वासन दिले आहे तर कॉग्रेस चे ठाणे जिल्हा सरचिटणीस व राजीव गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष चेतन पवार यानी मुरबाड तालुक्यातील सर्व गावागावात कल्याण -मुरबाड -माळशेज रेल्वे साठी संघर्ष अभियान राबवत जन आंदोलनाची तयारी केली आहे. याचाच अर्थ मुरबाड रेेल्वे हा यंदाच्या निवडुकीचा विषय ठरणार, तर आमदार किसन कथोरे यानी मुरबाड म्हणजे महामार्गाचे जाळे होणार असे सुचित केले पण रेल्वे मुळे अनेक प्रश्न सुटणार असल्याने 1950 मध्ये पहिला सर्वे, 1973,2003 नतंर 2010 साली प्रस्थावित 250 किमी रेल्वे साठी 772 कोटी मंजुर मात्र ते तसेच राहीले. तर 2015 मध्ये पुन्हा टिटवाळा -मुरबाड रेल्वेचे सर्वेक्षण असा आशावादी प्रवास सुरु असताना कल्याण मेट्रो चे भुमिपुजन चे फलक लावुन जखमेवर मीठ चोळल्याच्या प्रतिक्रिया नागरिकातुन येत आहेत. तर निवडणुकीसाठी काही महिने उरले असताना मुरबाड रेल्वे पुन्हा निवडणुक मुद्दा बनु शकतो तर आता पर्यतच्या सरकारने दिलेले आश्वासन याला जनता कसा प्रतिसाद देते यावर येणाऱ्या निवडणुकीत चुरस दिसणार आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)